आता कुठे जायचे आहे? आणि केव्हा?
उद्देशच कळला नव्हता आणि नाही.
काय जमवायचे आहे? काय राहिले आहे?
खूप सोडून दिले आहे; खूप सोडायचे अजून बाकी आहे...
हात सुटले पण पाय का बांधलेले आहेत?
वाट समोर दिसते आहे
पण पायांचं काय?
तो दोर कापायला हवा...
पुढे जायचंय..... तरंगायचं आहे...
मन संपवता येतं?
का ते कधी साथ सोडतच नाही?
त्याला आता काय हवं?
ते बोलतच नाही...
तरीही कहीतरी सांगतं....
मुखविण पाणी प्यालेली ती हरिणी
मुखविण बोलते सुद्धा?
आत्ता कळतंय,
ती हरिणी नव्हती ! ते चंचल मन ....
चिंचेच्या पानावर देऊळ रचता येत नाही...
पायाच नाही तर कळस कसला?....
म्हणून पाय सुटायला हवेत....
दोर कापायला हवेत !
वाट तर आहेच !!............23 11.2018
उद्देशच कळला नव्हता आणि नाही.
काय जमवायचे आहे? काय राहिले आहे?
खूप सोडून दिले आहे; खूप सोडायचे अजून बाकी आहे...
हात सुटले पण पाय का बांधलेले आहेत?
वाट समोर दिसते आहे
पण पायांचं काय?
तो दोर कापायला हवा...
पुढे जायचंय..... तरंगायचं आहे...
मन संपवता येतं?
का ते कधी साथ सोडतच नाही?
त्याला आता काय हवं?
ते बोलतच नाही...
तरीही कहीतरी सांगतं....
मुखविण पाणी प्यालेली ती हरिणी
मुखविण बोलते सुद्धा?
आत्ता कळतंय,
ती हरिणी नव्हती ! ते चंचल मन ....
चिंचेच्या पानावर देऊळ रचता येत नाही...
पायाच नाही तर कळस कसला?....
म्हणून पाय सुटायला हवेत....
दोर कापायला हवेत !
वाट तर आहेच !!............23 11.2018
No comments:
Post a Comment