Wednesday, January 20, 2016




21 जानेवारी 2016.
आज एका आवडत्या विषयावर भाषण ऐकायला मिळालं. वक्ते होते डॉ.अक्षयकुमार काळे.
आणि विषय होता गालिब.प्रसिद्ध उर्दू शायर.200 हून अधिक वर्षे झाली पण अजुन त्याची शायरी वाचली जाते.त्यावर समीक्षा केली जाते. अाजच्या सारखी त्यावर भाषणेही दिली जातात.
मी सुद्धा गालिब वर लिहिले आहे...
दिले-नादॉं तुझे हुआ क्या है । आखिर इस दर्द की दवा क्या है ।।
हा शेर तर सगळ्यांनाच माहीत आहे. अर्थ असा की ---प्रेम केलं की वाट्याला येतं ते दुःखच.
ह्या प्रेमाच्या दुःखावर काहीच इलाज नाही का? मग अरे, माझ्या अविचारी (मूर्ख) हृदया, तुला झालंय तरी काय?
का तू प्रेमात पडला आहेस?
गालिब चे आणखीही शेर पुढच्या Blog मधे लिहीन.


No comments:

Post a Comment