Saturday, August 24, 2013

24.8.13
प्रिय,
आज एकाकीपणाची कविता कुठेतरी वाचली आणि तुझी तीव्र आठवण झाली. कवितेतलं राक्षसप्राय आभाळ माझ्या अंगावर झेपावलं नि त्यानं मला चारही अंगांनी वेढून घेतलं. त्याच्या विक्राळ, गरगर गिरक्यांमध्ये फिरतांना संवेदनाहीन होऊन मी डोळे मिटून घेतले होते,एक हात बाहेर काढून. वाटलं होतं तू कुठून तरी अचानक येऊन धरशील माझा तो हात; आणि या गरगर भोवर्‍यातून मी बाहेर पडेन. सहीसलामत. केव्हातरी सारं थांबलं. जिथल्या तिथं. आभाळ जागच्या जागी गेलं आणि मी तिथे कवितेच्या ओळीत निपचित पडलेली सापडले,माझी मला.भोवंडून गेल्यामुळे त्राण सरलेली. पण मन कुठेतरी शांत झालं होतं. निमालं होतं. तूच जणू भेटून गेल्यासारखं. मग वाटलं ही एकाकीपणाची कविता खरी नाहीच. एकाकीपणा कधी खरा नसतोच ! काहीच पूर्ण अर्थानं एकाकी नसतं. आभाळाजवळ शून्यत्व असतं. मातीजवळ ममत्व.माझ्याजवळ तुझा भास आहे; तुझ्याजवळ माझी हाक. आपण एकाकी असतांनाच एकाकी नसल्याची ही प्रसन्न जाणीव आपलं तसं एकाकीपण संपवून टाकते. असं लोभस एकाकीपण कोणाला नको वाटेल? असं हवंसं वाटणारं एकाकीपण. समागमानंतर एकमेकांकडे पाठ करून विसावलेल्या जोडप्याच्या तृप्त, आत्ममग्न विसाव्यासारखं. अंगभर पसरलेलं. दुखरं तरीही सुखद. एकाकीपणाच्या गाभ्यात असतात असंख्य बहर,असंख्य इंद्रधनुष्यं !.......
तू आणि मी कधीच एकाकी होणार नाही आहोत; हो ना?
                  साजण.
                  त्याचं स्वप्नचित्र रेखाटतांना
                  उलगडताहेत...गंधाळताहेत रातराणी...
                  शृंगारलेल्या मधुमीलनाच्या आत्मविस्मृत रात्री...
                  पहाटवार्‍याच्या धीट नि आडदांड
                  धसमुसळेपणानंच,तेव्हा
                  निखळून पडते एकेक पाकळी त्या रात्रीची..
                  सावरता येत नाहीत अशावेळी पूर्वेचे वाहणारे रंग...
                  प्रकाशाच्या आरोहात, का असे विरून जातात प्रीतीचे सूर?
                  आणि सुरू होतात स्वप्नांचे अवरोह?
                  साजण ...निघून गेलेला...
                  धप्प ! कोसळलेलं वास्तव...!
                  मऽऽऽ गऽऽऽ रेऽऽऽ

                  साऽऽऽ......साजणाचा !

Sunday, August 11, 2013

तो आणि ती... आधुनिक काळातले...

            गजबजलेली संध्याकाळ...  मोटरसायकल कशीबशी पार्किंगच्या असंख्य टू-व्हीलर्स मध्ये घुसवून तो के एफ् सी त शिरला. एकही टेबल रिकामं नाही...? काउंटर वर त्यानं टेबलासाठी बुकिंग केलं... आणि एण्ट्रन्स पाशी येऊन थांबला...सेलफोन..'' हं.. बोल.. मी पोहचलोय्... काय?.... बंद पडलीय्?... तिथेच पार्क करून ये ना... हो, तुला कळतंय् हे मलाही कळतंय्.... ओके.. लवकर..ये...''
      थोड्या वेळातच ती येते.. ''हाय् ! थँक गॉड..टेबल ..जागा तरी चांगली मिळाली...ए, काय घेऊ या..ऑर्डर...''
      '' मी दिलीय्. मला माहीत आहे, तुझी इथली फेवरीट डिश कुठली ते...''
'' ओके..हं बोल .तुला माझ्याशी काहीतरी विशेष बोलयचंय्, म्हणाला होतास ना?''
'' या... लिसन.. मला यूएस्. ला ऍडमिशन मिळालीय्. पुढच्या पंधरा दिवसात निघावं लागेल...सो...'' तो.
      '' बघ, मी म्हटलंच होतं...तुला ईझीली मिळेल म्हणून...''
      '' मग? यावर काय म्हणायचंय् तुला?...आपल्या रिलेशन बद्दल तुझ्या घरी माहीत आहे...तुझे पेरेंट्स काय म्हणतील?''
      '' तू आता पाच वर्षं राहणार ना तिकडे ?..'' ती.
      '' पण आपण रोज भेटूच नं... ईमेल..आहे.. फोन आहे...वेबकॅम.... बघू सुध्दा शकू.. आणि वर्षातून एकदा मी येऊ ही शकेन...पण ते आत्ताच सांगता नाही येणार..'' तो. 
      '' हं...मीही बिझी असेन माझ्या अभ्यासात.....'' ती.
      '' थांबलीस का ? बोल ना.. तुला काहीतरी म्हणायचंय्...'' तो अपेक्षेनं तिच्याकडे पाहातो.
      पण ती गप्प. '' हे बघ, मी तुझ्या आई-बाबांना येऊन भेटावं असं तुला वाटतंय् का?...तर मी...  ''
      त्याला मधेच थांबवत ती म्हणते,...'' नाही रे! मी प्रॅक्टिकली विचार करतेय्.. पाच वर्ष म्हणजे काही थोडा काळ नाही.. या पाच वर्षात काहीही घडू शकतं...काळाबरोबर आपण दोघंसुध्दा बदलू शकतो... मागली पाच वर्ष आठवून बघ. आपल्यात सतत बदल होत असतात...साध्या साध्या गोष्टीत सुध्दा...''
      '' शुअर...आधी मला नूडल्स खूप आवडायच्या.. पण यू नो? आय् जस्ट डोण्ट लाइक ईव्हन द आयडिया...'' तो उगाचच जोक करायचा प्रयत्न करतो.
      '' लुक्, आय एम सीरीयस..'' ती खरंच गंभीर होते. '' ओके ,तू जोक मधे म्हणालास तेच खरं असेल तर ? आज तुला मी आवडते आहे, सपोज्, उद्या तुझं मत बदललं... म्हणजे बदलूही शकतं... किंवा माझंही... हो ना? ''
      '' तुला नेमकं काय म्हणायचं आहे ? '' त्याचा लाइट मूड विरघळून जातो.
ती म्हणते, '' विचार करून बघ ना, तू परदेशी वातावरणात, वेगळ्या कल्चर मधे जाशील. नवे मित्र-मैत्रिणी होतील..तुझ्या सवयी बदलतील...यू विल बी एक्सपोज्ड टु अ टोटली न्यू ऍटमॉसफिअर...मग कदाचित तुझं मन इतरांशी माझी तुलना करेल...इथल्या गोष्टी तुला बंधनकारक वाटायला लागतील....''
      '' पण म्हणून आपलं प्रेम....'' तो.
      '' ऐक, मी म्हणते तसंच होईल असं नाही मला म्हणायचं. पण पाच वर्ष खूप मोठा काळ आहे, म्हणून मी एक शक्यता वर्तवली..''
     '' तू म्हणतेस ते योग्यच आहे, असं मला पटायला लागलंय्..''
      '' माणसानं प्रॅक्टिकली विचार करावा असं मला वाटतं. आणि जर मी म्हणते तसं काही नाही घडलं, तर आपली रिलेशनशिप आपण कण्टिन्यू करणारच आहोत....पण लेट अस बी ओपन...'' तिचे विचार स्पष्ट होते.
      '' मीच नाही, तूही नव्या सिच्युएशन ला सामोरी जाणार आहेस...''
      '' हो, असं समजू या की ही आपली टेस्ट आहे ! सगळं असंच राहिलं तर वेल एण्ड गुड ! पण नाही राह्यलं तर, 'आता हे त्याला/तिला कसं सांगू' असं दडपण दोघांनाही वाटता कामा नये..'' ती जणू त्याला समजावीत होती.
      तो डिश संपवत होता म्हणून काही बोलला नाही की बोलायला काही उरलं नाही म्हणून गप्प झाला ते कळत नव्हतं.
      तीच म्हणाली, '' केव्हा निघतोयस् मग?''
'' सतरा तारखेच्या रात्री..''
'' ओके, विश यू गुड लक एण्ड सक्सेस.''
'' आय् विल बी इन टच्..''तो.
'' हो मी सुध्दा...''ती
      ''निघायचं ?'' त्यानं विचारलं. ''हो, तू मला त्या ब्रिज पाशी सोड. ऍक्टिवा बंद पडलीय ना, तिचं पाह्यला पाहिजे...''
      दोघं एकाच मोटर-सायकलवर गेले. मात्र त्यांचा पुढचा प्रवास एका वाटेने होणार आहे का रस्ते वेगळे होणार आहेत याची फिकीर त्या क्षणी दोघांनाही नव्हती.....
                                                            संगीता जोशी.





Saturday, August 3, 2013

      सुभाषिते...
                                          संगीता जोशी
                 
       देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,
      एक दिवस घेता घेता, घेणार्‍याचे हात घ्यावे...
कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. आता ह्या ओळी पहा, ‘’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’’ह्या ओळी कुसुमाग्रज यांनी सागराला उद्देशून म्हटल्या आहेत. हे दोघेही ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी आहेत.
   सुरेश भट यांच्या ह्या ओळी पाहा,
      उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
अशा ओळी सहज सर्वांच्या ओठी घोळतात.एकवेळ कवीचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या ओळी मात्र नेहमीच्या वापरातले वाक्प्रचार वापरावेत, तशा वापरल्या जातात. त्यामुळे ते कवी अजरामर झालेले असतात. ह्यांनाच म्हणतात, सुभाषिते.
      अशीच एक ओळ...’’आहे मनोहर तरी गमते उदास’’ तुम्हाला आठवलं ना की सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं ‘’आहे मनोहर तरी..’’हेच शीर्षक आहे!
      पण ज्या कवितेतील ही ओळ आहे, ती कविता वा तो कवी आपल्याला
फारसा माहीत नाही. ते कवी होते, दिनकर नानाजी शिंदे. त्यांनी सरस्वतीकंठाभरण ह्या टोपण-नावाने लेखन केलं आहे.
पूर्वी, कवितेची एखादी ओळ देऊन कवींना समस्यापूर्ती करण्यास सांगत असत. म्हणजे, दिलेली ओळ आणखी ओळी लिहून त.यात गुंफायची. आहे मनोहर तरी गमते उदास, या ओळीची समस्यापूर्ती करणारी आठ कडवी दिनकर नानाजी शिंदे यांनी लिहिली. ती सगळीच कविता फार सुंदर आहे. सगळं काही आहे, पण एक काहीतरी नाही अशी खंत , आणि त्यामुळे येणारे औदासीन्य प्रत्येक कडव्यात आलेलं आहे. त्यातील काही कडवी अशी आहेत... कविता वसंततिलका या वृत्तात लिहिलेली आहे.
      सर्वांगसुंदर,सुभूषण वस्त्रयुक्त । चैतन्य, वाणि, मन,बुध्दिहि ज्या प्रशस्त ।
ऐसे शरीर, परि शील नसे तयास । आहे मनोहर तरी गमते उदास ।। 
खरंय् ना ? एखाद्या व्यक्तीजवळ शरीरसौष्ठव आहे,ते सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेलं आहे, व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे, ती व्यक्ती बोलण्यात चतुर आहे,मनानं निर्मळ आहे, बुध्दिमानही आहे, पण त्या व्यक्तीची वागणूक मूल्यांना धरून नाही, तर ते सर्व गुण वाया गेले असेच नाही का?
पुढील कडवे असे आहे..
आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी । उद्यान एक भरले लतिका-विशेषी।
तेथे परंतु न वसंत करी विलास । आहे मनोहर तरी गमते उदास ।।
एखाद्या उद्यानात आंब्याची डौलदार झाडं आहेत, विशेष प्रकारच्या सुंदर वेली आहेत, पण या सगळ्यावर मोहोरच नाही, फुलांचा वसंतच नाही,तर काय उपयोग? पुढे कवी लिहितो,
निद्रेत मी नृपति होउनि सौख्य भोगी ।
की चित्पदी मिळुनि जाइ बनोनि जोगी ।
जेव्हा कळे सकल हा परि स्वप्नभास ।
आहे मनोहर तरी गमते उदास ।।
---एखादेवेळी आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात आपण राजा असतो,सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेत असतात;किंवा एखादेवेळेस स्वप्नातच आपण कुणी योगी असतो; आपली साधना सफल होऊन आपण ईश्वरचरणी विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो....ही दोन्ही स्वप्ने आनंद देणारी आहेत.. पण ती स्वप्नेच आहेत. जाग आल्यावर जेव्हा कळतं की तो आनंद क्षणिकच होता, तेव्हा मन अगदीच उदास होऊन जातं...
पण उदास न होता आपण शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा असतो.
तसा आनंद शोधणं हेच तर मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे !

                                                संगीता जोशी      सुभाषिते...
                                          संगीता जोशी
                 
       देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,
      एक दिवस घेता घेता, घेणार्‍याचे हात घ्यावे...
कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. आता ह्या ओळी पहा, ‘’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’’ह्या ओळी कुसुमाग्रज यांनी सागराला उद्देशून म्हटल्या आहेत. हे दोघेही ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी आहेत.
   सुरेश भट यांच्या ह्या ओळी पाहा,
      उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
अशा ओळी सहज सर्वांच्या ओठी घोळतात.एकवेळ कवीचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या ओळी मात्र नेहमीच्या वापरातले वाक्प्रचार वापरावेत, तशा वापरल्या जातात. त्यामुळे ते कवी अजरामर झालेले असतात. ह्यांनाच म्हणतात, सुभाषिते.
      अशीच एक ओळ...’’आहे मनोहर तरी गमते उदास’’ तुम्हाला आठवलं ना की सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं ‘’आहे मनोहर तरी..’’हेच शीर्षक आहे!
      पण ज्या कवितेतील ही ओळ आहे, ती कविता वा तो कवी आपल्याला
फारसा माहीत नाही. ते कवी होते, दिनकर नानाजी शिंदे. त्यांनी सरस्वतीकंठाभरण ह्या टोपण-नावाने लेखन केलं आहे.
पूर्वी, कवितेची एखादी ओळ देऊन कवींना समस्यापूर्ती करण्यास सांगत असत. म्हणजे, दिलेली ओळ आणखी ओळी लिहून त.यात गुंफायची. आहे मनोहर तरी गमते उदास, या ओळीची समस्यापूर्ती करणारी आठ कडवी दिनकर नानाजी शिंदे यांनी लिहिली. ती सगळीच कविता फार सुंदर आहे. सगळं काही आहे, पण एक काहीतरी नाही अशी खंत , आणि त्यामुळे येणारे औदासीन्य प्रत्येक कडव्यात आलेलं आहे. त्यातील काही कडवी अशी आहेत... कविता वसंततिलका या वृत्तात लिहिलेली आहे.
      सर्वांगसुंदर,सुभूषण वस्त्रयुक्त । चैतन्य, वाणि, मन,बुध्दिहि ज्या प्रशस्त ।
ऐसे शरीर, परि शील नसे तयास । आहे मनोहर तरी गमते उदास ।। 
खरंय् ना ? एखाद्या व्यक्तीजवळ शरीरसौष्ठव आहे,ते सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेलं आहे, व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे, ती व्यक्ती बोलण्यात चतुर आहे,मनानं निर्मळ आहे, बुध्दिमानही आहे, पण त्या व्यक्तीची वागणूक मूल्यांना धरून नाही, तर ते सर्व गुण वाया गेले असेच नाही का?
पुढील कडवे असे आहे..
आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी । उद्यान एक भरले लतिका-विशेषी।
तेथे परंतु न वसंत करी विलास । आहे मनोहर तरी गमते उदास ।।
एखाद्या उद्यानात आंब्याची डौलदार झाडं आहेत, विशेष प्रकारच्या सुंदर वेली आहेत, पण या सगळ्यावर मोहोरच नाही, फुलांचा वसंतच नाही,तर काय उपयोग? पुढे कवी लिहितो,
निद्रेत मी नृपति होउनि सौख्य भोगी ।
की चित्पदी मिळुनि जाइ बनोनि जोगी ।
जेव्हा कळे सकल हा परि स्वप्नभास ।
आहे मनोहर तरी गमते उदास ।।
---एखादेवेळी आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात आपण राजा असतो,सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेत असतात;किंवा एखादेवेळेस स्वप्नातच आपण कुणी योगी असतो; आपली साधना सफल होऊन आपण ईश्वरचरणी विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो....ही दोन्ही स्वप्ने आनंद देणारी आहेत.. पण ती स्वप्नेच आहेत. जाग आल्यावर जेव्हा कळतं की तो आनंद क्षणिकच होता, तेव्हा मन अगदीच उदास होऊन जातं...
पण उदास न होता आपण शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा असतो.
तसा आनंद शोधणं हेच तर मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे !
                                                संगीता जोशी      सुभाषिते...
                                          संगीता जोशी
                 
       देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,
      एक दिवस घेता घेता, घेणार्‍याचे हात घ्यावे...
कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. आता ह्या ओळी पहा, ‘’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’’ह्या ओळी कुसुमाग्रज यांनी सागराला उद्देशून म्हटल्या आहेत. हे दोघेही ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी आहेत.
   सुरेश भट यांच्या ह्या ओळी पाहा,
      उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
अशा ओळी सहज सर्वांच्या ओठी घोळतात.एकवेळ कवीचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या ओळी मात्र नेहमीच्या वापरातले वाक्प्रचार वापरावेत, तशा वापरल्या जातात. त्यामुळे ते कवी अजरामर झालेले असतात. ह्यांनाच म्हणतात, सुभाषिते.
      अशीच एक ओळ...’’आहे मनोहर तरी गमते उदास’’ तुम्हाला आठवलं ना की सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं ‘’आहे मनोहर तरी..’’हेच शीर्षक आहे!
      पण ज्या कवितेतील ही ओळ आहे, ती कविता वा तो कवी आपल्याला
फारसा माहीत नाही. ते कवी होते, दिनकर नानाजी शिंदे. त्यांनी सरस्वतीकंठाभरण ह्या टोपण-नावाने लेखन केलं आहे.
पूर्वी, कवितेची एखादी ओळ देऊन कवींना समस्यापूर्ती करण्यास सांगत असत. म्हणजे, दिलेली ओळ आणखी ओळी लिहून त.यात गुंफायची. आहे मनोहर तरी गमते उदास, या ओळीची समस्यापूर्ती करणारी आठ कडवी दिनकर नानाजी शिंदे यांनी लिहिली. ती सगळीच कविता फार सुंदर आहे. सगळं काही आहे, पण एक काहीतरी नाही अशी खंत , आणि त्यामुळे येणारे औदासीन्य प्रत्येक कडव्यात आलेलं आहे. त्यातील काही कडवी अशी आहेत... कविता वसंततिलका या वृत्तात लिहिलेली आहे.
      सर्वांगसुंदर,सुभूषण वस्त्रयुक्त । चैतन्य, वाणि, मन,बुध्दिहि ज्या प्रशस्त ।
ऐसे शरीर, परि शील नसे तयास । आहे मनोहर तरी गमते उदास ।। 
खरंय् ना ? एखाद्या व्यक्तीजवळ शरीरसौष्ठव आहे,ते सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेलं आहे, व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे, ती व्यक्ती बोलण्यात चतुर आहे,मनानं निर्मळ आहे, बुध्दिमानही आहे, पण त्या व्यक्तीची वागणूक मूल्यांना धरून नाही, तर ते सर्व गुण वाया गेले असेच नाही का?
पुढील कडवे असे आहे..
आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी । उद्यान एक भरले लतिका-विशेषी।
तेथे परंतु न वसंत करी विलास । आहे मनोहर तरी गमते उदास ।।
एखाद्या उद्यानात आंब्याची डौलदार झाडं आहेत, विशेष प्रकारच्या सुंदर वेली आहेत, पण या सगळ्यावर मोहोरच नाही, फुलांचा वसंतच नाही,तर काय उपयोग? पुढे कवी लिहितो,
निद्रेत मी नृपति होउनि सौख्य भोगी ।
की चित्पदी मिळुनि जाइ बनोनि जोगी ।
जेव्हा कळे सकल हा परि स्वप्नभास ।
आहे मनोहर तरी गमते उदास ।।
---एखादेवेळी आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात आपण राजा असतो,सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेत असतात;किंवा एखादेवेळेस स्वप्नातच आपण कुणी योगी असतो; आपली साधना सफल होऊन आपण ईश्वरचरणी विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो....ही दोन्ही स्वप्ने आनंद देणारी आहेत.. पण ती स्वप्नेच आहेत. जाग आल्यावर जेव्हा कळतं की तो आनंद क्षणिकच होता, तेव्हा मन अगदीच उदास होऊन जातं...
पण उदास न होता आपण शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा असतो.
तसा आनंद शोधणं हेच तर मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे !
                                                संगीता जोशी      सुभाषिते...
                                          संगीता जोशी
                 
       देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,
      एक दिवस घेता घेता, घेणार्‍याचे हात घ्यावे...
कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. आता ह्या ओळी पहा, ‘’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’’ह्या ओळी कुसुमाग्रज यांनी सागराला उद्देशून म्हटल्या आहेत. हे दोघेही ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी आहेत.
   सुरेश भट यांच्या ह्या ओळी पाहा,
      उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
अशा ओळी सहज सर्वांच्या ओठी घोळतात.एकवेळ कवीचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या ओळी मात्र नेहमीच्या वापरातले वाक्प्रचार वापरावेत, तशा वापरल्या जातात. त्यामुळे ते कवी अजरामर झालेले असतात. ह्यांनाच म्हणतात, सुभाषिते.
      अशीच एक ओळ...’’आहे मनोहर तरी गमते उदास’’ तुम्हाला आठवलं ना की सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं ‘’आहे मनोहर तरी..’’हेच शीर्षक आहे!
      पण ज्या कवितेतील ही ओळ आहे, ती कविता वा तो कवी आपल्याला
फारसा माहीत नाही. ते कवी होते, दिनकर नानाजी शिंदे. त्यांनी सरस्वतीकंठाभरण ह्या टोपण-नावाने लेखन केलं आहे.
पूर्वी, कवितेची एखादी ओळ देऊन कवींना समस्यापूर्ती करण्यास सांगत असत. म्हणजे, दिलेली ओळ आणखी ओळी लिहून त.यात गुंफायची. आहे मनोहर तरी गमते उदास, या ओळीची समस्यापूर्ती करणारी आठ कडवी दिनकर नानाजी शिंदे यांनी लिहिली. ती सगळीच कविता फार सुंदर आहे. सगळं काही आहे, पण एक काहीतरी नाही अशी खंत , आणि त्यामुळे येणारे औदासीन्य प्रत्येक कडव्यात आलेलं आहे. त्यातील काही कडवी अशी आहेत... कविता वसंततिलका या वृत्तात लिहिलेली आहे.
      सर्वांगसुंदर,सुभूषण वस्त्रयुक्त । चैतन्य, वाणि, मन,बुध्दिहि ज्या प्रशस्त ।
ऐसे शरीर, परि शील नसे तयास । आहे मनोहर तरी गमते उदास ।। 
खरंय् ना ? एखाद्या व्यक्तीजवळ शरीरसौष्ठव आहे,ते सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेलं आहे, व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे, ती व्यक्ती बोलण्यात चतुर आहे,मनानं निर्मळ आहे, बुध्दिमानही आहे, पण त्या व्यक्तीची वागणूक मूल्यांना धरून नाही, तर ते सर्व गुण वाया गेले असेच नाही का?
पुढील कडवे असे आहे..
आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी । उद्यान एक भरले लतिका-विशेषी।
तेथे परंतु न वसंत करी विलास । आहे मनोहर तरी गमते उदास ।।
एखाद्या उद्यानात आंब्याची डौलदार झाडं आहेत, विशेष प्रकारच्या सुंदर वेली आहेत, पण या सगळ्यावर मोहोरच नाही, फुलांचा वसंतच नाही,तर काय उपयोग? पुढे कवी लिहितो,
निद्रेत मी नृपति होउनि सौख्य भोगी ।
की चित्पदी मिळुनि जाइ बनोनि जोगी ।
जेव्हा कळे सकल हा परि स्वप्नभास ।
आहे मनोहर तरी गमते उदास ।।
---एखादेवेळी आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात आपण राजा असतो,सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेत असतात;किंवा एखादेवेळेस स्वप्नातच आपण कुणी योगी असतो; आपली साधना सफल होऊन आपण ईश्वरचरणी विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो....ही दोन्ही स्वप्ने आनंद देणारी आहेत.. पण ती स्वप्नेच आहेत. जाग आल्यावर जेव्हा कळतं की तो आनंद क्षणिकच होता, तेव्हा मन अगदीच उदास होऊन जातं...
पण उदास न होता आपण शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा असतो.
तसा आनंद शोधणं हेच तर मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे !
                                                संगीता जोशी      सुभाषिते...
                                          संगीता जोशी
                 
       देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे,
      एक दिवस घेता घेता, घेणार्‍याचे हात घ्यावे...
कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. आता ह्या ओळी पहा, ‘’अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला.’’ह्या ओळी कुसुमाग्रज यांनी सागराला उद्देशून म्हटल्या आहेत. हे दोघेही ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी आहेत.
   सुरेश भट यांच्या ह्या ओळी पाहा,
      उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
अशा ओळी सहज सर्वांच्या ओठी घोळतात.एकवेळ कवीचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या ओळी मात्र नेहमीच्या वापरातले वाक्प्रचार वापरावेत, तशा वापरल्या जातात. त्यामुळे ते कवी अजरामर झालेले असतात. ह्यांनाच म्हणतात, सुभाषिते.
      अशीच एक ओळ...’’आहे मनोहर तरी गमते उदास’’ तुम्हाला आठवलं ना की सुनीताबाई देशपांडे यांच्या आत्मचरित्राचं ‘’आहे मनोहर तरी..’’हेच शीर्षक आहे!
      पण ज्या कवितेतील ही ओळ आहे, ती कविता वा तो कवी आपल्याला
फारसा माहीत नाही. ते कवी होते, दिनकर नानाजी शिंदे. त्यांनी सरस्वतीकंठाभरण ह्या टोपण-नावाने लेखन केलं आहे.
पूर्वी, कवितेची एखादी ओळ देऊन कवींना समस्यापूर्ती करण्यास सांगत असत. म्हणजे, दिलेली ओळ आणखी ओळी लिहून त.यात गुंफायची. आहे मनोहर तरी गमते उदास, या ओळीची समस्यापूर्ती करणारी आठ कडवी दिनकर नानाजी शिंदे यांनी लिहिली. ती सगळीच कविता फार सुंदर आहे. सगळं काही आहे, पण एक काहीतरी नाही अशी खंत , आणि त्यामुळे येणारे औदासीन्य प्रत्येक कडव्यात आलेलं आहे. त्यातील काही कडवी अशी आहेत... कविता वसंततिलका या वृत्तात लिहिलेली आहे.
      सर्वांगसुंदर,सुभूषण वस्त्रयुक्त । चैतन्य, वाणि, मन,बुध्दिहि ज्या प्रशस्त ।
ऐसे शरीर, परि शील नसे तयास । आहे मनोहर तरी गमते उदास ।। 
खरंय् ना ? एखाद्या व्यक्तीजवळ शरीरसौष्ठव आहे,ते सुंदर वस्त्रालंकारांनी नटलेलं आहे, व्यक्तिमत्त्व प्रसन्न आहे, ती व्यक्ती बोलण्यात चतुर आहे,मनानं निर्मळ आहे, बुध्दिमानही आहे, पण त्या व्यक्तीची वागणूक मूल्यांना धरून नाही, तर ते सर्व गुण वाया गेले असेच नाही का?
पुढील कडवे असे आहे..
आम्रादिकी गगनचुंबित थोर वृक्षी । उद्यान एक भरले लतिका-विशेषी।
तेथे परंतु न वसंत करी विलास । आहे मनोहर तरी गमते उदास ।।
एखाद्या उद्यानात आंब्याची डौलदार झाडं आहेत, विशेष प्रकारच्या सुंदर वेली आहेत, पण या सगळ्यावर मोहोरच नाही, फुलांचा वसंतच नाही,तर काय उपयोग? पुढे कवी लिहितो,
निद्रेत मी नृपति होउनि सौख्य भोगी ।
की चित्पदी मिळुनि जाइ बनोनि जोगी ।
जेव्हा कळे सकल हा परि स्वप्नभास ।
आहे मनोहर तरी गमते उदास ।।
---एखादेवेळी आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नात आपण राजा असतो,सगळी सुखं आपल्या पायाशी लोळण घेत असतात;किंवा एखादेवेळेस स्वप्नातच आपण कुणी योगी असतो; आपली साधना सफल होऊन आपण ईश्वरचरणी विलीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो....ही दोन्ही स्वप्ने आनंद देणारी आहेत.. पण ती स्वप्नेच आहेत. जाग आल्यावर जेव्हा कळतं की तो आनंद क्षणिकच होता, तेव्हा मन अगदीच उदास होऊन जातं...
पण उदास न होता आपण शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा असतो.
तसा आनंद शोधणं हेच तर मानवी जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे !
                                                संगीता जोशी