निरागस
प्रेम......
ती एक जाहिरात
तुम्ही टी.व्ही.वर पाहिली आहे ना? एक मुलगा सोफ्यावर पहुडला आहे.. सायकलच्या
घंटीचा आवाज ऐकून पग जातीचा कुत्रा त्या मुलाला टी-शर्ट ओढून उठवतो...सायकलवरून
त्याची आवडती मुलगी तिथून जाते..
दुसर्या
जाहिरातीत तीच दोघं जिन्याच्या लँडिंग मधे बोलत बसलेली असतात...एक सेल्समन एक
बॉक्स घेऊन येतो... पण हे पग त्याच्यावर भुंकून त्याला थोपवतं.....व्होडाफोनच्या
जाहिरातीतील त्या दोघांचं प्रेम किती कोवळं व निरागस दाखवलंय नाही? ती जाहिरात
पाहिल्यापासून एक गोष्ट सारखी आठवतेय मला. तीच तुम्हालाही संगायचीय. वाचा तर....
खूप
वर्षांपूर्वीची गोष्ट.दिल्लीच्या चांदणी चौकाजवळ त्यावेळी एक झोपडपट्टी होती.त्यात
एक मुस्लिम कुटुंब रहायचं. चार मुली आणि आई-वडील.वडिलांची थातुर-मातुर
नोकरी.त्यातही धरसोड. त्यामुळे सर्वांना गरिबीचे चटके सहन करावे लागत होते. मोठी
मुलगी पाच-सात वर्षांची. बाकीच्या त्याहून लहान ! पण ही मोठी मुलगी दिसायला फार
गोड होती. बाकीच्याही चांगल्या होत्या,पण हिचा नूर काही वेगळाच होता.वर्ण गोरा तर
होताच पण त्यावर एक तांबूस छटा होती. एखाद्या परीसारखी दिसायची ती. आई-वडिलांना
वाटे,कसे वाढवावे यांना? जिवाला घोर !
जवळच किराणा
मालाचं दुकान होतं. हातात पैसे आले की तेव्हढ्यापुरते खाण्याचे जिन्नस विकत
आणायचे.रोजच मोठ्या बेबीला ते काम करावं लागे. सकाळी ती न चुकता तिकडे जायची.अगदी
त्याचवेळी एक मुलगा शाळेच्या बससाठी तिथे येऊन उभा रहायचा. तिच्यापेक्षा 2-3
वर्षांनी मोठा असेल. बरेचदा तो तिच्याकडे बघून हसायचा.ही गोरी गोरी सुंदर मुलगी
त्याला खूप आवडायची. भीड चेपली तेव्हा तो तिच्याशी बोलू लागला.
''तुझं नाव
काय?''
''मुमताज. तू
शाळेत जातोस ना?''
''हो. आणि तू
?'' मानेने नाही सांगत ती म्हणाली,
''आम्ही गरीब आहोत ना, म्हणून शाळेची फी परवडत नाही आम्हाला''
''तुम्ही कुठे राहता?'' त्यानं विचारलं, तेव्हा ती उत्तरली,
''पलीकडच्या झोपडपट्टीत''
एका दिशेकडे बोट दाखवून तो म्हणाला, ''मी त्या बंगल्यात राहतो.
माझं नाव लतीफ.''
हळूहळू संवाद वाढू लागला.
दोघांना एकमेकांशी गप्पा मारायला आवडू लागलं.ओढ वाटू लागली.पण त्यात एक निरागसपणा
होता.
कळत काहीच नव्हतं,पण एक दिवस तो म्हणाला,'' मला तू खूप आवडतेस. तू
एंजल सारखी दिसतेस... मी खूप शिकेन.तू... म्हणजे आपण मोठे झालो ना की आपण लग्न
करू. चालेल?''
तिनंही खुद्कन हसून हो म्हटलं.
त्यानं हळूच तिच्या गुलाबी गालाला स्पर्श केला.ती हरखून गेली...दिवसभर ती विलक्षण
आनंदात होती...जणू तरंगत होती.
पण काय झालं कुणास ठाऊक ! दुसर्याच दिवशी मुमताज सह सगळं कुटुंब
दिल्ली सोडून मुंबईला जायला निघालं.! परत न येण्यासाठी !कारण काय ते मुमताजला
माहीतच नव्हतं. मुंबईला पोहोचल्यानंतर तिला कळलं, तिचे अब्बाजान तिला सिनेमात काम मिळावं यासाठी घेऊन आले होते. फार
थांबावं लागलं नाही.एंजल सारख्या या मुलीला नवव्या वर्षीच कॅमेर्यापुढे उभं रहावं
लागलं. तिथून पुढे तिनं मागे वळून पाहिलंच नाही. अनेकांनी तिच्यावर प्रेम केलं. पण
ती लतीफला केव्हाच विसरू शकली नाही. कारण ते होतं विशुध्द निरागस पहिलं प्रेम!
त्याला वासनेचा ओंगळ स्पर्शही नव्हता.!!
ही मुमताज कोण ते आलं लक्षात? सौंदर्यसाम्राज्ञी मधुबाला !!
जिच्या सौंदर्याला तोड नव्हती व आजही नाही...... असं म्हणतात , 2000
साली जगतिक पातळीवर झालेल्या संशोधनानुसार सर्वाधिक सुंदर नटी असण्याचा मान
मधुबालेलाच मिळाला.मृत्यूनंतर चाळीस वर्षांनीही ! सुप्रसिध्द नटी मेरिलीन मन्रो
च्याही वरचं स्थान तिला मिळालं.1969 साली जेव्हा ती मेली, तेव्हा लतीफ ढसाढसा रडला
होता.........
मधुबालेबद्दल खूप काही जाणून
घ्यायचं असेल तर ..... पुढच्या एखाद्या भागात !
संगीता जोशी.
No comments:
Post a Comment