Saturday, March 30, 2013

My Poems

My Poems


.Ìãð¦¦ã- Êããä••ã¦ãã                                                      Ìãð¦¦ã - ½ãðØããàããè

ÌããßÊãñ ¹ãã¶ã •ããèÌã¶ããÞãñ Öñ                                            ãä‡ãЦããè ºããñÊãã¾ãÞãñ ÀãÖî¶ã ØãñÊãñ
            Ìããªßã ¦ãî ‚ã¦ãã ‡ã슟ñÖãè ¶ãñ...                                       ŒãÀñ ÔããâØãã¾ãÞãñ  ÀãÖî¶ã ØãñÊãñ...

            ÌããØãÌãî ½ããè ‡ãŠÔãñ ¶ãÌãñ ‚ããñ¢ãñ                                           •ãÀãè Öãñ¦ããÔã ¦ãî ½ã㢾ããÞã ¹ããÍããè
            ‚ãããä£ãÞãñ ¢ãñ¹ã¦ãñ ¶ã ØããŸãñ¡ñ...                                       ¦ãìÊãã Íããñ£ãã¾ãÞãñ ÀãÖî¶ã ØãñÊãñ...

            Í㺪 Öãñ¦ãã¦ã ‚ãã¹ãìÊãñ ÌãõÀãè                                           ‡ãŠÍããè ƒ¦ã‡ã‹¾ãã¦ã Ôã⣾ãã‡ãŠãß ¢ããÊããè
            Í㺪 ‚ããñŸã½ã£ãñÞã ÀãÖî ªñ...                                       ¹ãƇãŠãÍããè ¶Öã¾ãÞãñ ÀãÖî¶ã ØãñÊãñ...

            ½ããèÞã ÔÌãÔ¦ãã¦ã ½ãããä¶ãÊãã Ôããõªã                                        ãäªÊãñ ¦ãî ½ããØã¥¾ãã‚ãã£ããèÞã ÔããÀñ
            ¦ãñÊã ØãñÊãñ ãä¶ã ¦ãî¹ãÖãè ØãñÊãñ...                                        ¦ãìÊãã ½ããè ²ãã¾ãÞãñ ÀãÖî¶ã ØãñÊãñ...

            ÊããÌã ‚ãã£ããè ¹ã¥ããÔã ÔãÌãÃÔÌãã                                         ¦ãì¢ããè Öãñ¦ãñ,¦ãì¢ããè ¦ã¶ã-½ã¶ã-£ã¶ãã¶ãñ
            ‚ãããä¥ã Öã¦ããè ŒãìÍããÊã ¹ãŠãÔãñ Üãñ...                                   '‚ãÖâ ' ‚ã¹ããþãÞãñ ÀãÖî¶ã ØãñÊãñ...

            ¹ãÆã¥ã ‚ããÊãñ ŒãÀñÞã ‡ã⊟ãÍããè                                                     ====
            Ìã㛦ãñ ‡ãŠã ¦ãÀãè •ãØããÌãñÔãñ...

                        ==

Friday, March 29, 2013

Sahir Ludhiyanvi


उर्दू शायर साहिर लुधियानवी हा शायरीच्या आभाळातला चमचमता तारा होता,पण त्याच्या वाट्याला आलेलं जीवनाचं आभाळ मात्र अंधःकारमय होतं.वडिलांनी आईला तलाक दिला, तो मात्र आईजवळच राहिला.गरिबीतही शिक्षण घेतलं. पण तेही अर्धवट सोडावं लागलं.
आयुष्यात प्रेम तर भेटलं पण लाभलं कधीच नाही.चुकून प्रेयसीकडून होकारार्थी उत्तर मिळालंच आणि तिनं भेटायला यायचं कबूल केलंच तर साहिरची एक छोटीशी अट आहे. तिची इच्छा आहे की 'प्रेमाचं चिरंतन प्रतीक' असलेल्या ताजमहलच्या साक्षीनं भेटावं.ते संकेतस्थळ साहिरला मात्र मान्य नाही. तो म्हणतो,
            ताज तेरेलिये इक मज्ञहरे उल्फत ही सही
            मेरी महबूब, कहीं और मिला कर मुझसे...
प्रिये, तुला हा ताजमहल म्हणजे प्रेमाचं द्योतक वाटत असेलही,पण तरीही आपण दुसरीकडे कुठेतरी भेटत जाऊ या.....
            अनगिनत लोगोंने दुनियामें मोहब्बत की है
कौन कहता है कि सादिक न थे जज्बे उनके  
           

लेकिन उनके लिए तशहीर का सामान नहीं
            क्योंकि वो लोग भी अपनीही तरह मुफलिस थे....
---अगं ! जगात असंख्य लोकांनी प्रेम केलं आहे.कोण म्हणतं की त्यांचं प्रेम खरं नव्हतं?किंवा शाहजहॉं प्रमाणे उत्कट नव्ह्तं? पण काय आहे माहीतय् का?त्यांच्याजवळ त्या प्रेमाची 'जाहिरात' करण्याचं कुठलंही साधन नव्हतं.कारण ते लोक तुझ्या-माझ्यासारखे निर्धन होते...गरीब होते.
मेरी महबूब! उन्हें भी तो मोहब्बत होगी
जिनकी सन्नाई ने बख्शी है इसे शक्ले-जमील
उनके प्यारोंके मकाबिर रहे बेनामो-नमूद
आजतक उनपे  जलाई न किसीने किंदील....
---प्रिये, ज्या(कारागिरांनी) ह्या ताजमहलाला एवढं सुंदर रूप दिलं त्यांनीही तर कोणावर तरी प्रेम केलं असेलंच ना! त्यांच्याही प्रिय व्यक्तींच्या कबरी असतीलच कुठेतरी..सर्वांना अज्ञात, अशा जागी.कुणी दखलही घेत नसेल कबरींची, मग त्यावर एखादा दीप लावणं तर दूरच...
ये चमनजार,ये जमनाका किनारा,ये महल
ये मुनक्कश दरोदीवार, ये मेहराब,ये ताक  
इक शहेनशाह ने दौलतका सहारा लेकर
हम गरीबोंकी मोहब्बतका उडाया है मजाक...
मेरी महबूब कहींऔर मिला कर मुझसे.....
---यमुनेच्या तीरावरचं हे शाही उद्यान, हा ताजमहाल, ह्या नक्षीदार भिंती आणि महिरपी कमानी! केवढं वैभवशाली हे सगळं दृष्य! पण मला वाटतं,एका सम्राटानं संपत्तीचा आधार घेऊन ताज बांधून केवळ आपणां गरिबांची खिल्ली उडविली आहे, दुसरं काही नाही...म्हणूनच आपण दुसरीकडे कुठेतरी भेटू या....
ताजमहल या कवितेनं धमाल उडवून दिली व साहिर काव्यप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला.ताजमहलकडे पाहण्याचा सर्वसाधारण दृष्टिकोन आश्चर्याचा व त्याच्या सौंदर्यापुढे नतमस्तक होण्याचा असा होता. त्याला छेद देणारे व दुसरा पैलू मांडणारे विचार साहिरनं प्रथमच मांडले होते. त्यानंतर आणखीही कवींनी ताज वर कविता केल्या,पण साहिरच्या 'ताजमहल' ची सर कशालाही नाही. अशारीतीनं ताजमहल हे साहिरचंच स्मारक झालं आहे ! निदान काव्य-रसिकांपुरतं तरी !
आता तुम्ही ताजमहल पाहायला जाल तेव्हा तुम्हाला साहिरची आठवण होईलच,त्याचबरोबर त्या अज्ञात कारागिरांचीही होईल ना? होईलच, मला खात्री आहे!

तळागाळातल्या लोकांबद्दलही मनात करुणा बाळगण्याचा संदेश ही कविता देते, नाही का?
आज कॉलेज मध्ये जाणार्‍या मेघनाला जेव्हा ही कविता समजावून दिली,तेव्हा ती सुध्दा आश्चर्यचकित झाली व साहिर च्या प्रतिभेने दिपून गेली. महान साहित्य हे कालातीत असतं,हेच खरं ! !

Friday, March 15, 2013

श्रद्धा

आज तंत्रज्ञान इतकं पुढं गेलं आहे की हजारो मैलांवर चाललेली मॅच आपण घरबसल्या पाहू शकतो.सचिनने महाशतकाची काढलेली शंभरावी धाव पाहून आनंद लुटू शकतो.आज आपल्याला टी.व्ही., मोबाईल, कॉम्प्यूटर इत्यादि शिवाय जगता येईल का? कोणीही हो म्हणणार नाही.पण आमच्या आधीची पिढी अशी होती की ते लोक सुधारणांपासून कोसो दूर होते.तंत्रज्ञानाच्या प्रगतीची काही चिन्हं दिसतही होती. पण त्याचा उपयोग करून जीवनमान सुधारणं सामान्य माणसाच्या आवाक्यात नव्हतं.उदा.ग्रामोफोन किंवा रेडिओ! एकतर मोठी शहरं सोडली तर वीजही नसायची.मग या साधनांचा काय उपयोग? फक्त श्रीमंतांनाच ह्या गोष्टी परवडत असत.
      असंच एक मिनी-शहर. धुळे. तिथे जुन्या धुळ्यात एक कुटुंब रहात असे.त्या गृहस्थांचं नाव केशवराव कुलकर्णी.त्यांना शास्त्रीय संगीताची फार आवड.तेव्हा रेडिओ क्वचित कोणाकडे तरी असे. अशाच एका श्रीमंत घरी ते शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकायला कधीकधी जायचे.पूर्वी माणुसकी जागृत होती. पाहुण्यांचं आदरातिथ्यही व्हायचं.अर्थात् तरीही केशवरावांना संकोच व्हायचा. पण काय? संगीताचं प्रेम स्वस्थ बसू देत नसे.त्यांची पत्नी एकदा म्हणाली, ''तुमचा स्वभाव संकोची. असं करू या का? आपणच रेडिओ घेऊन टाकू.'' पत्नीचं खरंच कौतुक होतं.त्यावेळ्चे तुटपुंजे पगार व रेडिओची किंमत पगाराच्या साठ सत्तर पट ! पण पतीची ओढ पत्नीने जाणली होती.
      खूप काटकसर करून हे जमवायचेच असे दोघांनी संमतीने ठरविले.त्यावेळी एकाच कंपनीचा रेडिओ मिळायचा. बहुधा नॅशनल ! पूर्वी हप्त्याने काहीही मिळत नसे.पैसे जमल्यावर केशवराव रेडिओ घरी घेऊन आले.वीजही होती. पत्नी व मुलांना वाटले,आता गाणे ऐकू येणार. पण घरातला विणलेला 'रुमाल' केशवरावांनी रेडिओवर घालून तो झाकून ठेवला. मग त्यांनी 'लिसनर'चा अंक मागून आणला.व हिराबाई बडोदेकर यांचे गाणे कधी आहे ते शोधले.(त्यावेळी पूर्ण महिन्याचे कार्यक्रम लिसनर या अंकात येत असत.) मुंबई रेडिओवर पंधरा दिवसांनंतर हिराबाईंचे गाणे होते. त्यावेळी प्रोग्रॅम लाइव्ह असत. रेकॉर्डिंगचा शोधच लागला नव्हता. केशवरावांनी सगळ्यांना संगितले, ''पंधरा दिवसांनंतरच रेडिओ लावायचा. त्यांच्याच गाण्याने शुभारंभ करायचा.!'' सगळे हिरमुसले. पण केशवराव बधले नाहीत. शिवाय वडिलांचा उपमर्द करण्याची कोणाची हिम्मत नव्हती व इच्छाही नव्हती.
      अखेर तो दिवस आला. रेडिओवरचा रुमाल निघाला. प्रेमाने रेडिओ पुसला.त्यावर फुले वाहिली गेली.उदबत्तीही लावण्यात आली.आणि घड्याळात सकाळचे साडेसातला काही सेकंद बाकी असतांना बटन ऑन करण्यात आले.(पूर्वीचे रेडिओ तापायला काही क्षण जात.) तसे क्षण गेले आणि हिराबाईंचा षड्ज ऐकू आला.केशवरावांच्या डोळ्यात पाणी तरळले..!हिराबाईंवर केवढी श्रध्दा ! त्यांच्या गाण्यावर केवढं अपार प्रेम !! केशवराव समाधानात बुडून गेले.डोळे मिटून भक्तिभावाने गाणे ऐकत राहिले....
      गाणे संपले.उद् घोषणा झाली. ''हिराबाई बडोदेकर राग अल्हैयाबिलावल गात होत्या. तबल्याची साथ निजामुद्दिन खॉं यांनी केली.''
      रेडिओ बंद केला गेला. पत्नी बाहेर आली.तिच्या हातात गोड शिर्‍याच्या बशा होत्या. नैवेद्याची वाटी रेडिओपुढेही ठेवण्यात आली. सर्व जण आनंदात होते..एक सोहोळा पार पडला होता...! असे होते पूर्वीचे लोक ! तुम्हाला हसू येतंय्? नका हसू. कारण त्यांच्या त्या भावना अस्सल होत्या. ती श्रध्दा होती.
      चाळीसच्या दशकात घडलेली ही घटना नावासह संपूर्ण खरी आहे ! खंत वाटते, कुठे गेली आता तशी माणसे? त्या श्रध्दा? ती कलेची पूजा?
आपण फारच कोरडे होऊन गेलो आहोत का?
                                          संगीता जोशी